देवभूमीत नागपूरच्या ‘महासूर्या’चा डंका! ३० वर्षांच्या निःस्वार्थ सेवेसाठी अरविंद कुमार रतूडी यांना ‘कर्मवीर योद्धा सन्मान’; ३,००० पुरस्कारांचा ऐतिहासिक विक्रम!
Summary
हिमाचल प्रदेश/नागपूर: पत्रकारिता, समाजसेवा आणि मानवाधिकाराच्या क्षेत्रात आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कामगिरीने संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण करणारे नागपूरचे सुप्रसिद्ध समाजसेवक अरविंद कुमार रतूडी यांनी आता थेट हिमालयाच्या कुशीत नागपूरचा आणि महाराष्ट्राचा डंका वाजवला आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील […]
हिमाचल प्रदेश/नागपूर: पत्रकारिता, समाजसेवा आणि मानवाधिकाराच्या क्षेत्रात आपल्या धडाकेबाज आणि निर्भीड कामगिरीने संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण करणारे नागपूरचे सुप्रसिद्ध समाजसेवक अरविंद कुमार रतूडी यांनी आता थेट हिमालयाच्या कुशीत नागपूरचा आणि महाराष्ट्राचा डंका वाजवला आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील मां रेणुकादेवी धाम, ददाऊ येथील पवित्र ‘पिनाकी पीठ’ येथे रतूडी यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘कर्म वीर योद्धा सन्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
येथील व्यापारी महासंघ, ट्रान्सपोर्ट युनियन आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रतूडी यांना पुष्पहार घालण्यासोबतच हिमाचलची लोकप्रिय आणि सन्मानाचे प्रतीक असलेली पारंपरिक टोपी व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

३० वर्षांची अखंड साधना आणि ३,००० पुरस्कारांचा महाविक्रम!
अरविंद कुमार रतूडी (संस्थापक अध्यक्ष – किंग कोबरा ऑर्गनायझेशन युथ फोर्स) हे गेल्या ३० वर्षांपासून अविरतपणे, निष्पक्ष आणि निर्भीडपणे जनसेवा, प्राणीसेवा आणि देशसेवा करत आहेत.
विविध मोहिमांचे यशस्वी नेतृत्व: ‘राष्ट्र निर्माण की ओर दो कदम’, ‘नारी शक्ति एक सम्मान’, ‘पशु क्रूरता के खिलाफ जंग’ आणि ‘राष्ट्रीय धर्म सर्वोपरि’ अशा अनेक सामाजिक मोहिमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे.
ऐतिहासिक विक्रम: इतक्या कमी वयात देशातील विविध राज्यांतून, तसेच सर्व धर्म, पंथ आणि मजहबांकडून तब्बल ३,००० च्या आसपास शासकीय व बिगरशासकीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे ते देशातील एकमेव सामाजिक कार्यकर्ते ठरले आहेत.
योगी श्री बर्फानी केदारेश्वर बाबांच्या अध्यक्षतेखाली सोहळा
देवभूमी हिमाचल प्रदेशच्या पावन भूमीवर हा दिमाखदार सोहळा पिनाकी पीठ हिमालयाचे विश्वस्त आणि श्रद्धेय योगी श्री बर्फानी केदारेश्वर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रतूडी यांच्या लोककल्याणकारी सामाजिक कार्याची भूरी-भूरी प्रशंसा केली आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सिनेस्टाईल संवाद: “लोकांचे प्रेम हीच आमची खरी कमाई!”
सत्कारमूर्ती अरविंद कुमार रतूडी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अत्यंत प्रेरणादायी आणि सिनेस्टाईल वक्तव्य केले. ते म्हणाले:
”आमचा धर्म आणि आमची ओळख म्हणजे केवळ ‘राष्ट्रधर्म सर्वोपरि’ हाच आहे. माणुसकी आणि मानवता साकार करणे हेच आमचे ध्येय आहे. सेवाभावी काम करताना आम्हाला कोणत्याही पैशाची, संपत्तीची किंवा प्रसिद्धीची हाव नाही, तर पूर्ण समर्पणाची गरज आहे. लोकांचे मिळणारे प्रेम, आशीर्वाद आणि हा हौसला हीच आमची आणि आमच्या कुटुंबाची खरी कमाई आणि दौलत आहे!”
१९६२ च्या युद्धनायकांना पुरस्कार समर्पित!
रतूडी यांनी हा अत्यंत मानाचा सन्मान त्यांचे दिवंगत वडील श्री चरणानन्द राघवानन्द रतूडी (पीआरडीचे ब्लॉक कमांडर) आणि दिवंगत आई श्रीमती जशोमतीदेवी उर्फ जशमहीदेवी रतूडी (एसएसबीमधील शस्त्र प्रशिक्षक) यांना समर्पित केला. हे दोन्ही पती-पत्नी १९६२ च्या ऐतिहासिक युद्धाचे नायक आणि नायिका होते. त्यांच्यासोबतच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठबळ देणाऱ्या असंख्य हितचिंतकांना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला आहे.
दिग्गजांची मांदियाळी
या ऐतिहासिक सोहळ्याला आचार्य अभिषेक शर्मा, तरुण शर्मा, आयुष शर्मा, गोविंद सिंह ठाकुर, यशपाल सिंह ठाकुर, सचिन त्यागी, हरदयाल सिंह, पंकज कुमार कोली, तपेन्द्र चौहान, शुभम चौहान, पवन चौहान यांच्यासह संघ, बजरंग दल, कोली समाज, दलित समाज आणि विविध सामाजिक संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी व गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकुमार खोब्रागडे
ब्युरो रिपोर्ट, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
