करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, देणार ५ लाखांची आर्थिक मदत.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 3 जून. 2021:-
करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा मदतीचा हात दिला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे ५ लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बकेत जमा केली जाणार आहे. या अनाथ मुलांना ही रक्कम त्यांच्या २१ व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (The state government will provide financial assistance of Rs 5 lakh for children orphaned due to corona)
करोनामुळे आतापर्यंत एकूण ५ हजार १७२ मुलांनी आपल्या आई-वडिलांपैकी एकाला गमावले आहे. तर एकूण १६२ मुलांनी आपले आई आणि वडिल असे दोघांनाही गमावले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच उद्योग आणि व्यवसायासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडूनही मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
करोनामुळे ज्या मुलांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे अशा मुलासाठी केंद्र सरकारने मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ही मदत केली जाणार आहे. ज्या मुलाने आपले आई-वडील किंवा त्यांपैकी एकाला गमावले आहे अशा मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी मासिक सहायता रक्कम मिळणार आहे. तसेच त्याच्या वयाच्या २३ व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये मिळणार आहे.
या मदती बरोबरच अशा अनाथ मुलांना मोफत शिक्षण मिळण्या बाबतही सरकारने योजना आखली आहे. त्याअंतर्गत सरकार मुलांना शिक्षणासाठी कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे त्या कर्जासाठी केंद्र सरकार त्याचे व्याज पीएम केअर्स फंडातून दिले जाणार आहे. इतकेच नाही, तर अशा मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देखील दिला जाणार आहे. या विम्याचा प्रिमियम देखील पीएम केअर्स फंडातून दिला जाणार आहे.
करोना बाधित मुलांचे प्रमाण वाढलं, हे खरं आहे;