BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठीच्या तहानेचा ‘रिमोट कंट्रोल’ आता भंडाऱ्यात! गणेशपूर MSEB च्या मनमानीचा वरठीला फास!

Summary

मुख्य बातमी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ​फ्लॅशबॅक: रात्रीचा खेळ आणि सकाळी तहान! ​वरठी गावात सकाळी ९ वाजता नळाची वाट पाहणाऱ्या डोळ्यांना आता फक्त कोरड्या तोट्या दिसत आहेत. हे का घडतंय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा ‘पोलीस योद्धा’ टीमने ग्राऊंड झिरोवर […]

मुख्य बातमी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

​फ्लॅशबॅक: रात्रीचा खेळ आणि सकाळी तहान!

​वरठी गावात सकाळी ९ वाजता नळाची वाट पाहणाऱ्या डोळ्यांना आता फक्त कोरड्या तोट्या दिसत आहेत. हे का घडतंय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा ‘पोलीस योद्धा’ टीमने ग्राऊंड झिरोवर जाऊन वरठीचे सरपंच श्री. चांगदेव रघुते यांची भेट घेतली, तेव्हा एक धक्कादायक ‘सस्पेन्स’ समोर आला. वरठीच्या या ‘पाणी-बाणी’चा मुख्य व्हिलन वरठीत नाही, तर चक्क भंडाऱ्याच्या गणेशपूर MSEB मध्ये बसला आहे!

​प्रवेश १: गणेशपूरचा ‘पॉवर’ गेम!

​सरपंच चांगदेव रघुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खमाटा येथील वॉटर सप्लाय प्लांटला होणारा वीज पुरवठा हा भंडारा येथील गणेशपूर MSEB उपकेंद्रावर अवलंबून आहे.

​भ्रष्ट कारभार: गणेशपूर उपकेंद्रामध्ये तासनतास विद्युत प्रवाह खंडित केला जातो.

​साखळी बिघडली: तिकडे गणेशपूरचा फ्युज उडाला की इकडे खमाटा प्लांटची मोटार शांत होते.

​परिणाम: जोपर्यंत गणेशपूरची वीज येत नाही, तोपर्यंत खमाटाची टाकी भरत नाही आणि परिणामी वरठीच्या जनतेला साडे नऊ वाजेपर्यंत पाण्यासाठी ताटकळावे लागते.

​प्रवेश २: ग्रामपंचायत आणि MSEB – जबाबदारी कोणाची?

​सरपंच साहेबांनी तांत्रिक कारण तर सांगितले, पण मग प्रश्न उरतोच…

१. नियोजन शून्य: जर गणेशपूरकडून वारंवार धोका मिळत असेल, तर ग्रामपंचायतीने ‘पर्यायी वीज वाहिनी’साठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार का केला नाही?

२. जनतेचा अंत: गणेशपूरच्या चुकीची शिक्षा वरठीच्या करदात्या नागरिकांनी का भोगायची?

३. वॉटर टॅक्सचा वापर: जनतेकडून गोळा केलेला पैसा अशा तांत्रिक सुधारणांसाठी का वापरला जात नाही?

​’पोलीस योद्धा’चा तिखट सवाल: आता तरी जाग येईल का?

​गणेशपूर MSEB (भंडारा) साठी इशारा:

​तुमच्या उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे एका संपूर्ण गावाची पाणी व्यवस्था कोलमडली आहे. हा हलगर्जीपणा तात्काळ थांबवा, अन्यथा लोकशक्ती संघटना तुमच्या कार्यालयासमोर ‘घागर मोर्चा’ काढायला मागे-पुढे पाहणार नाही!

​वरठी ग्रामपंचायतीला सल्ला:

​केवळ ‘गणेशपूर’कडे बोट दाखवून तुमची जबाबदारी संपत नाही. खमाटा प्लांटला अखंडित वीज मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करा किंवा तिथे सौर ऊर्जेची (Solar Plant) व्यवस्था करा.

​क्लायमॅक्स: हिशोब तर द्यावाच लागेल!

​आंबेडकर वॉर्डातील माता-भगिनींची पायपीट आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता असह्य झाली आहे. सरपंच साहेब, आता फक्त कारणं सांगून चालणार नाही, तर ‘ॲक्शन’ हवी आहे! जर गणेशपूर MSEB मुळे हा त्रास होत असेल, तर त्यांना ‘पोलीस योद्धा’च्या भाषेत जाब विचारण्याची वेळ आता आली आहे.

​सावधान! वरठीच्या पाणी प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांनो आणि कामात कसूर करणाऱ्यांनो… ‘लोकशक्ती’चा हा प्रहार आता थेट मंत्रालयापर्यंत धडकणार!

​- अमर वासनिक न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क भ्रष्टाचार विरोधी लढा… आता थांबणार नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *