BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

केल्टेक एनर्जीज प्रकल्प वाढिसाठी लोक(जन) सुनावणी संपन्न प्रकल्पाच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न

Summary

कोंढाळी- नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा गरमसुर येथील मे.केल्टेक एनर्जीज लिमिटेड च्या प्रस्तावित नवीन स्फोटक उत्पादनाच्या समावेशासह प्रस्तावित प्रकल्प विस्तारासाठी योजना आखली आहे. या नवीन प्रकल्पासाठी आवश्यक, जल , वायू, ध्वनी, धूर पेयजल आदींच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातून प्रकल्पा […]

कोंढाळी-
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा गरमसुर येथील मे.केल्टेक एनर्जीज लिमिटेड च्या प्रस्तावित नवीन स्फोटक उत्पादनाच्या समावेशासह प्रस्तावित प्रकल्प विस्तारासाठी योजना आखली आहे. या नवीन प्रकल्पासाठी आवश्यक, जल , वायू, ध्वनी, धूर पेयजल आदींच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे दृष्टीकोणातून प्रकल्पा लगतची स्थानिक स्वराज्य संस्था व लगतच्या गावांचे नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाप्रशासन व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उप विभागीय प्रादेशिक कार्यालय नागपूर एक कडून 17मे रोजी दुपारी 12वाजता गरमसुर नागपूर चे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांचे अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक सार्वजनिक जन सुनावणी प्रकल्पाचे परिसरात सार्वजनिक जाहीर लोक सुनावणी घेण्यात आली.
या सार्वजनिक लोक सुनावणी दरम्यान ग्राम पंचायत गरमसुर व लगतच्या भागातील ३०० हून अधिक पुरुष आणि महिला सुनावणीत सहभागी झाले होते.

या प्रसंगी अनेक प्रकल्प संचालकानी वाढिव प्रकल्पाची आवश्यकता व सध्याची गरज या बाबतीत लोक सुनावणीला उपस्थित नागरिक व अधिकार्यांना सविस्तर माहिती देण्यात आली . या नंतर लोक सुनावणी चे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरीकांना समस्या मांडण्यासाठी आवाहन केले. या दरम्यान गरमसुर निवासी गोविंद पवार,महूरखोरा येथील बंडू राठोड, सरपंच यशवंत पवार, रामराव चव्हाण, राजेश मडके, नरेश नागपूरे शेकापूर, बिहालगोंदी सरपंच रंजना थूट, तसेच जलसंवर्धन एन जी ओ टी एस भाल यांनी या प्रसंगी जलसंधारण, जलसंवर्धन, रेन हार्वेस्टिंग, या भागातील विहीरीच्या पापण्यांची पातळी बाबद तसेच स्थानिकांना रोजगार व आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी संबंधाने लोकांनी जण सुनावणी दरम्यान आप आपल्या समस्या माडल्या, या प्रसंगी जनसुनावणी ला उपस्थित पर्यावरण व अन्य ‌प्रशाकिय अधिकार्यानी सम बैठकीदरम्यान उपस्थित समस्या जाणून घेतल्या. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन साधक बाधक चर्चा दोन्ही बाजूंचे विचार जाणून घेण्यात आले आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात बाबद माहिती दिली.

“जनसुनावणीच्या ठिकाणी शेकडो लोक सहभागी झाले होते . कोंढाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असला तरी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली नाही. बैठकीच्या ठिकाणी काही नागरिकांनी समस्या मांडल्या ग्रामस्थांना त्यांचे मत मांडण्याची परवानगी होती,” तसेच आणखी समस्या असल्यास 18मे चे सायंकाळ पर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर यांच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन या लोक सुनावणी चे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ च्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी सांगितले की आम्ही सर्व मते नोंदवली आहेत. लोकांचे मत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे पाठवले जाईल,” हेमा देशपांडे यांनी सांगितले .

या सार्वजनिक सुनावणीला काटोल उप विभागीय अधिकारी पियूष चिवंडे,महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MSPCB), नागपूर अधिकारी हेमा देशपांडे, काटोल चे तहसीलदार राजू रणवीर, प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी धनश्री पाटील तथा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तसेच केल्टेक एनर्जीज लिमिटेड प्रकल्पाच अधिकारी अतुल डावरे,गौरव केकतपुरे, प्रकाश बल्की, तसेच शाम मिश्रा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *