महाराष्ट्र हेडलाइन

▪देशाची चाल,लाल आणि पाल ▪ ▪’ शिवसेना ‘ ची ओळख असलेल्या वाघाची झडप नाही ▪ ▪ ती बंगालच्या वाघिणीने दाखवली आणि गुजराते तल्या सिंहाची आयाळ भादरून जशास तसे उत्तर दिले▪ ▪येथे च मोदी-शाहचा पराभव झाला▪ ▪ज्ञानेश महाराव यांचा बेधडक प्रहार ▪

Summary

-पोलिस योद्धा वृत्त सेवा -तथापि कोरोना च्या पहिल्या लाटेच्या तोंडावर झालेल्या ऑपरेशन कमल मध्ये मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात आलं आणि शिवराजसिंह चौहान यांचं सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे, तिथे 2018 च्या निवडणुकीत भाजपची 165 जागा वरून 109 वर घसरगुंडी झाली […]

-पोलिस योद्धा वृत्त सेवा -तथापि
कोरोना च्या पहिल्या लाटेच्या तोंडावर झालेल्या ऑपरेशन कमल मध्ये मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात आलं आणि शिवराजसिंह चौहान यांचं सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे, तिथे 2018 च्या निवडणुकीत भाजपची 165 जागा वरून 109 वर घसरगुंडी
झाली होती. ह्या 56 जागा जिंकत
काँग्रेस ने 58 वरून 114 जागा जिंकत बहुमत प्राप्त केले होते.
तरीही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता हाती
येताच मोदी–शाहा यांनी कर्नाटकात आणि मध्यप्रदेशात
सत्ता पालटीचे ऑपरेशन कमल
राबवलं.
ह्या पृष्ठभूमीवर पश्चिम बंगाल च्या 2016 आणि ताज्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या
तृणमूल काँग्रेस पक्षाने मोदी-शा ह
जोडीचा ज्या हिमतीने पराभव केला, त्याकडे पाहिले पाहिजे .
ह्या जोडीने विरोधकांना संपविण्यासाठी विविध राज्यात
जे प्रयोग केले, ते सारे प्रयोग एकत्रितपणे पश्चिम बंगाल मधील
ताज्या निवडणुकीत केले. देशात कोरोना महामारीचा फेरा जोरात असतांना देशाचे गृहमंत्री 3–4
आठवडे पश्चिम बंगालात मतांची गणित जुळवण्यासाठी ठाण मांडून होते. पश्चिम बंगाल बरोबरच आसाम ,केरळ पा नडेचरी आणि तामिळनाडू
ह्या राज्यात ही विधानसभा
निवडणूका होत्या. तीथे ही
भाजप चे उमेदवार होते .
पण ह्या राज्यातल्या एकूण
सभांच्या दुप्पट सभा नरेंद्र मोदी
नी पश्चिम बंगालात घेतल्या .
आसामात भाजप ला सत्ता
मिळाली , पण 126 पैकी 60
जागा जिंकल्यामुळे बहूमत मिळाले च नाही . पॉं डे चरी त
कुठल्याच पक्षाला बहुमत नसल्याने तिथे तोडफोडीच राजकारण पुढच्या निवडणुकापर्यंत होत राहील .
केरळात डाव्यांची पुन्हा सत्ता आली य.
तामिळनाडू त करुणानिधी पुत्र स्टालिन याने द्रमुकची सत्ता आणलीय .
जयललिता यांच्या मृत्यू नंतर तामिळनाडू त अण्णा द्रमुक ची सत्ता टिकून राहावी , यासाठी मोदी सरकार ने मोठी रसद पुरवली . ह्या मदतीच्या माध्यमातून संघ परिवाराने तामिळनाडू त भाजप ची
शक्ती दाखवायला सुरुवात केली होती. निवडणुकीत अण्णा द्रमुक – भाजप अशी युती ही झाली होती, पण मोदी शा ह यांच्या सत्तेचा प्रभाव तामिळनाडू त पडला नाही .
कॉन्ग्रेसने द्रमुक बरोबर युती केली होती. त्यामुळे
काँग्रेस ला वाट्याला आलेल्या 25
पैकी 18 जागा जिंकता आल्या
ह्या चार राज्याच्या निकलांपेक्षा पश्चिम बंगाल चा निकाल देशाच्या
राजकारणावर अधिक प्रभाव टाक नारा आणि लोकमन व्यक्त
करणारा ठरलाय कारण ह्या
निकालाने मोदी लाटेचा अंत
दाखविला. तो समजून घेऊन वागण्यात लोकहीत आणि
देशभक्ती आहे.
महाराष्ट्राला इतर
राज्यांसारखा फ़क्त भूगोलच नाही
,तर इतिहास ही आहे, आणि तो
आम्ही जगवणारच !! अशी डरकाळी आचार्य अत्रे नी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात फोड
ली होती. शिवसेना ने आता महाविकास आघाडी सरकारच्या
माध्यमातून चुकीची दुरुस्ती केली
आहे. त्याचा आनंद देशभऱ्यातल्या लोकशाही वाद्यांना आणि संविधानाच्या संरक्षनाचा आग्रह धरणाऱ्यानां
होणारच.
ममता दीदींनी पश्चिम बंगालात ज्या प्रकारे मोदी शा ह
जोडीच नाक कापलं , ह्याचा आनंद निश्चित झाला . पण
ममता दिदींने ज्या हिमतीने
मोदी-शा हा यांच्या सत्ता मस्तीची दाढी उपडली तशी हिंमत सर्वांनी दाखवायला हवी.
लढणार्याच्या मागे लोक
उभे राहतात . भरभरून मत देतात,राज्य देतात . हा भारतातील प्रादेशिक पक्ष नेत्यांचा
इतिहास आहे. याचीच आठवण
पश्चिम बंगाल मधला ममता बॅनर्जी चा विजय करून देतो .

(लेखक हे जेष्ठ पत्रकार
व साप्ताहिक चित्रलेखा चे संपादक आहेत.)
मो. नं. 919322222145.

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪
▪महेश देवशोध (राठोड )▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *