चला तयारीला लागा….
ज्या शरद पवारने आजपर्यंत आंबेडकर समुहाला कधीच एकत्र येऊ दिल नाही..अण आलेच इकून तिकून तर टिकू दिल नाही….
आमच्या चळवळीचा सत्यानाश केला…नामांतर लढ्यात हजारो भिमसैनिकांच्या संसाराचे वाटोळे केले…कित्येकाला देशोधडीला लावले …कुणी म्हणाले घरात नाही पिठ ..अण माघतात विद्यापिठ…याही बहादराने आमच्या लोकांच्या कत्तली कराय लावल्या पण दुर्दैवाने ते त्यांच्या घरात झालेला तमाशा बघायला राहीले नाही….पण शरदराव मात्र भरल्या डोळ्यानी स्वतः च झालेल वाटोळ स्वतः च पहात आहेत….
दुसऱ्याच वाटोळ केल कि आपल आपोआपच होते हा नियतिचा नियमच आहे….
एकदा काकाची सत्ता गेलती पुतन्यामुळे….अण पुतन्याची गेलती मुतन्यामुळे…..
पण पुन्हा आता काकानी भाकरी भाजायला फिरवली…पण पुतन्या तवा घेऊनच पळाला……
हे अस होतचं असतं…
शेराल सवा शेर कुणीतरी भेटणारचं…..
असो…जे झाल ते झाल….पण आंबेडकर समाजाने यातून एक सबक शिकायला पाहीजे कि ..लुचे लांडी लबाडकी करणारे दलाल सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात …तर आपण बाबासाहेबांची औलाद आहोत…आपण का नाही एकत्र येत…..जर खरचं तुम्हाला सत्ता भोगायची असेल…..अण तुम्ही एकाच विचारांचे..एकाच बापाचे असाल तर सर्वानी गटतट …वादविवाद …मतभेद ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवा सोबत अर्थातच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लाऊन आता संपूर्ण शक्तीने मैदानात उतरायला हव..आर नाही तर पारची ही संविधानिक मतदानाच्या माध्यमातून आपण लढाई लढू…शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा शत्रुची कमजोरी असेल तेव्हा तेव्हा अमावस्याच्या भयान काळोखात हल्ला करायचे अण ती लढाई जिंकायचे..त्याचप्रमाणे आपण सुद्धा मतदानाच्या रुपातून हल्ला करुन 2024 ची लढाई सहज जिंकू शकतो…
त्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे….
चला उठा तयारीला लागा…,,,
आता फक्त ….भिमाच रक्त..
✍🏻अनिल खरात लिंगेकर
7620520415
