रीवा में प्रॉपर्टी डीलर की हत्या जब तक दम नहीं तोड़ा तब तक लाठी-डंडों से पीटते रहे बदमाश दोपहर में मिली थी धमकी, रात को घात लगाकर किया हमला
देखिए रीवा जिले से पंडित अभय तिवारी की खास रिपोर्ट रीवा में लेनदेन के पुराने मामले में एक प्रॉपर्टी डीलर…
आय दिन लगातार रीवा जिले में लूट और मार पीट की घटना बढ़ने के कारण रीवा के हाईवे में पुलिस प्रशाशन ने लगाई वाहन चेकिंग लगाई गई
रीवा जिले मै अपराध लूट पाट, मार पीट, तथा कई अपराध बढ़ते जा रहे है वही पुलिस ने रीवा की…
स्वतंत्रता दिवस के पावन पर्व पर विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम ने किया ध्वजारोहण और हर्ष उल्लास के साथ सेनानियो ने वतन की शान में की परेड
पंद्रह अगस्त के पावन पर्व पर आज ऐतिहासिक ध्वजा रोहन किया गया वही विधानसभा के अध्यक्ष माननीय गिरीश गौतम ने…
एक शाम जश्न ए आजादी के नाम कार्यक्रम आज
एक शाम जश्न ए आजादी के नाम कार्यक्रम आज बालाघाट — रोटरी क्लब ऑफ वैनगंगा द्वारा 15 अगस्त स्वतंत्रता दिवस…
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तूटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले त्यामुळे शहरी भागातील नागरिक…
कोरोनावर मात करण्यासाठी १०० टक्के लसीकरण करुया – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर, दि. 15 : कोरोनाच्या तिसऱ्या किंवा येणाऱ्या पुढच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांचे शंभर टक्के लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी…
जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, (जिमाका) दि. 15 – कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरिता…
कोरोनाला हरवित जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन थाटात साजरा
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत नेत्रदीपक…
सर्वांगीण विकासासोबत जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री दत्तात्रय भरणे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
सोलापूर, दि.15: जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त…
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
ठाणे दि.15 (जिमाका) : कोरोनाची दुसरी लाट योग्य पध्दतीने हाताळल्याने, आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महापौर नरेश मस्के, आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,,मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ,ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा,अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्री.शिंदे म्हणाले की,जिल्हा प्रशासन खुप चागंल्या प्रकारे काम करत आहे.कोरोनाची लढाई सर्वानी जीव धोक्यात घालून काम केले आहे.जे अधिकरी व कर्मचारी कोरोनाची लढाई लढताना शहिद झाले आहेत त्यांना सरकारनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांसाठी सिडको मध्ये 4500 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आल्यामुळे 30 शिवभोजन केंद् चालू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दती सोडून नवीन आधुनिक पध्दतीचा स्वीकार केला पाहिजे. कोकणात मुसळधार पावसामुळे जी आपत्ती आली होती. त्याच्या मदतीसाठी ठाणे महानगरपालिका,आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य महत्त्वाचे योगदान दिले आहे.यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी, संस्था यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे, ठाणे महानगरपालिका,आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य केल्याबदल जवान, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद,ठाणे यांचे मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या मुली व महिलांचा ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना जिल्हा स्तरावर महाआवास अभियान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आले. कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत. पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला पाहिजे.कोरानाची दुसरी लाट जरी नियंत्रणात असली तरी संकट टळलेलं नाही जनतेने या सर्व कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोना योद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
