हेडलाइन

‘हर घर झेंडा’, उपक्रमाला जिल्ह्यामध्ये यशस्वी करा  जिल्हाधिकारी आर. विमला

Summary

‘हर घर झेंडा’, उपक्रमाला जिल्ह्यामध्ये यशस्वी करा जिल्हाधिकारी आर. विमला   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हास्तरीय बैठक नागपुर- प्रतिनीधी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. या उपक्रमात आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला, सुधारणांना आपल्या देशाच्या […]

‘हर घर झेंडा’, उपक्रमाला जिल्ह्यामध्ये यशस्वी करा

जिल्हाधिकारी आर. विमला

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हास्तरीय बैठक

नागपुर- प्रतिनीधी

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. या उपक्रमात आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला, सुधारणांना आपल्या देशाच्या सामर्थ्याला, जनतेपुढे मांडणे, यासाठी प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून त्यासाठी प्रत्येक विभागाने, प्रत्येक कर्मचाऱ्यांने काम करावे,ऑगस्ट महिन्यात होणारा ‘हर घर झेंडा’, उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती भवनात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हास्तरीय कोअर कमिटीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, यांच्यासह 46 विभागाचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबतच्या सूचना प्रामुख्याने केल्या. 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्यात यावा, सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने प्रसिद्धी मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन आपल्या घरावर उभारावा, यासाठी त्यांना प्रेरित करण्यात यावे. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी प्रत्येक सामान्य माणसाला योग्य मार्गदर्शन केले जावेत, हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी, कापडापासून बनविलेला झेंडा असेल याची खातरजमा करावी. राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात सामान्य नागरिकांना उपलब्ध होईल यासाठीची खात्री बाळगण्याचे ही त्यांनी आवाहन केले. राष्ट्रध्वजाबद्दल ध्वजसंहिता असून त्याचे पालन देखील झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याबाबतची काळजी घेण्याचेही निर्देश त्यांना देण्यात आले. आपल्या घरावर झेंडा लावल्याची छायाचित्रे, चित्रफीत, ध्वनिमुद्रण केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या अमृत महोत्सव डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे त्यांनी सांगितले.

सर्व संस्थांनी, सर्व विभाग प्रमुखांनी, आपल्या अधिनस्त असणाऱ्या सगळ्या यंत्रणांना या संदर्भात निर्देश देण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी गेल्या वर्षभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबतची माहिती घेतली. या उपक्रमाच्या संदर्भात प्रत्येक कार्यालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत केलेला उपक्रम हा अपलोड करण्यात यावा, प्रत्येक कार्यालयापुढे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा लोगो लावावा, ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणवारांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करावे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा बाबतची माहिती जनसामान्यांना होईल, याचे नियोजन करण्यात यावे, ‘मेरा गाव मेरी धरोवर’ या अंतर्गत किमान पाच गावांमध्ये विशेष कार्यक्रम राबविण्यात यावे, प्रत्येक गावाचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, गावाचे वैभव, परंपरा, प्रथा या सर्वांचे दस्तऐवजीकरण करावे.

महानगरपालिकेसोबतच नगरपालिका नगरपरिषदा ग्रामपंचायत या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आखण्यात यावे, तसेच या संदर्भात कुठलीही अडचण असल्यास निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याबाबतची सूचनाही केली. महिनाभरात झालेला कार्यक्रमाचा मासिक अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांना कळविण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *