शेतकऱ्यांचे न्याय मागण्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार शेतकरी सुखी झाला तरच देश समृद्ध होईल – अनिल देशमुख

काटोल/प्रतिनिधी
सिमेवर सुरक्षा करणारे जवान व या देशाचा शेतकरी हेच या देशाला तारू शकतात .
अन् हे दोन्ही तारले गेले तरच देश समृद्ध होईल.
शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठीच केंद्र व राज्य सरकार सह सहकार मार्फत योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातूनच महाविकास आघाडी सतत प्रयत्न करत होती.व आजही आमचे तेच कार्य सुरू आहे .
देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही…
देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही. शेतकरी समृद्ध झाला तर देश महासत्ता होतो, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल पोलीस प्रकरणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी काटोल नरखेड तालुक्यातील कार्यकर्ते्यांसह न्यायालयीन तारखेवर आले असता सांगितले. तसेच महायुती सरकार अजूनही शेतकर्यांचे मुळ प्रश्न सोडविण्यासाठी अक्षम ठरत आहे. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा आंदोलन उभारण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन ही या प्रसंगी उपस्थित शेतकरी व कार्यकर्तयां आवाहन केले.
या प्रसंगी अनिल देशमुख यांनी सांगितले की मी स्वतः शेतकरी आहे. शेती करणारा समाज एक कुटुंब आहे. शेतकरी समृद्ध असावा या करिता देशाचे राष्ट्रीय नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे सोबत सतत बोलनी करत असतात. मात्र काही ठिकाणी शेतकरी आत्महत्यांबाबत दुखद घटना समोर येतात. हे काळजी करण्याचे कारण आहे. त्यावर नियंत्रण आणन्यासाठी ग्रामीण क्षेत्रात महा विकास आघाडी तर्फे आंदोलनासाठी सर्व पदाधिकारी गंभीरते विचार करत आहेत.
अशी माहिती अनिल देशमुख यांनी न्यायालयीन तारीख आटोपून न्यायालयाचे आवाराबाहेर काटोल/नरखेड तालुक्यातील कार्यकर्ते्यांसह बोलत होते.