BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोहाडीच्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना फुटला घाम

Summary

मोहाडी:- आमदार राजु कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली – तहसील कार्यालय मोहाडी येथे आयोजीत जनता दरबारात भुमिअभिलेख कार्यालयाच्या आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर आजचा जनता दरबार चांगलाच गाजला. आमदारांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच कानऊघाडणी केली. अनेक वेळा कार्यालयात समस्या किंवा तक्रारी घेऊन गेल्यावरही जनतेच्या […]

मोहाडी:- आमदार राजु कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली – तहसील कार्यालय मोहाडी येथे आयोजीत जनता दरबारात भुमिअभिलेख कार्यालयाच्या आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर आजचा जनता दरबार चांगलाच गाजला. आमदारांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच कानऊघाडणी केली.

अनेक वेळा कार्यालयात समस्या किंवा तक्रारी घेऊन गेल्यावरही जनतेच्या समस्या सुटत नसल्याने असे नागरिक वारंवार आमदार कार्यालयाशी संपर्क साधतात. जनतेच्या तक्रारी एकाच वेळी एकाच मंचावर सोडविण्यासाठी सदर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, अवकाळी पाऊस, गारपीट मुळे शेतीचे, घरकुल, गोठ्याचे नुकसान, पंचनामे या विषयावर नागरीकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. या शिवाय इंतरही विभागाच्या तक्रारी आल्या.

सर्वाधिक तक्रारी भूमी अभिलेख कार्यालयाशी तसेच

तहसीलदारांची आमदारांची केली कान उघाडणी

महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विरोधात होत्या. शेवंता रामदास भोयर रा. निलज खुर्द यांनी शेतीच्या मोजणीसाठी पैसे भरले. भूमि अभिलेख कार्यालयाकडून त्यांना मोजणीचा नोटीस देण्यात आला नाही. मोजणीच्या दिवशी त्यांना फोन करून मोजणीला येणार असल्याचे सांगितले. अर्जदाराने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या ठिकाणी घेऊन गेले

परंतु भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी दिवसभर आलेच नाही. अर्जदार भूमी अभिलेख कार्यालयात मोजनी बाबत विचारायला गेले असता त्यांना मोजणी करण्यात आली असे सांगून दुसऱ्यांदा मोजणी करण्यासाठी पुन्हा पैसे भरण्यास सांगण्यात आले. या मुद्द्यावर जनता दरबारात चांगलीच खडाजंगी झाली. या प्रकरणावरून आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना
चांगलेच धारेवर धरले. देव्हाडा बुज. येथील एका महिलेच्या शेतीचा सहा महिन्यापासून तलाठ्याने फेरफार केला नसून त्यांना वारंवार तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावत असल्याची बाब पुढे आली. दुसऱ्या एका प्रकरणात

करडीचे मंडळ अधिकारी पांदण रस्त्यावरील कामाकरिता तेथील सरपंचाला स्वाक्षरीसाठी मागे मागे फिरायला लावल्याचा प्रकार समोर आला. यावरून अधिकारी कर्मचारी किती मुजोर झालेले आहेत याचा प्रत्येय जनता दरबारात आल्याने आमदारही स्तब्ध झाले.

तहसीलदारांचा बेजबाबदारपणा

जिल्हाधिकारी हे जिल्हा दंडाधिकारी तसेच त्यांच्या अखत्यारीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय येतात. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असतात. तसेच त्यांच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालये येतात. परंतु येथे आयोजित जनता दरबारात उपस्थित शेकडो नागरिकांच्या तसेच आमदार राजु कारेमोरे यांच्या समोर येथील तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी माझ्या अखत्यारीत इतर कार्यालय येत नाहीत व त्यांना मी कोणतेही निर्देश देऊ शकत नाही असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावर जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी तहसीलदारांना निवम सांगितले. जनता दरबारात सभापती नरेश ईश्वरकर आणि किरण अतकरी यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू करून अधिकारी कर्मबाऱ्यांची बोलती बंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *