BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुसळधार पावसात वीज पडून बैल आणि म्हशींचा मृत्यू बोरगाव/खापरी शिवारातील घटना बैल/म्हशीच्या मृत्युमुळे शेतकरी अडचणीत

Summary

कोंढाळी- १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, वादळ आणि मुसळधार पावसात, काटोल तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी प्रेमराज मानमोडे यांच्या गोठ्यासमोर बांधलेला सहा वर्षांचा बैल आणि खापरी बारवकर येथील रोहित राजु उइके या शेतकरी/ गोपालकाची पाच वर्षांची म्हैस (गर्भवती म्हैस) […]

कोंढाळी-
१७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, वादळ आणि मुसळधार पावसात, काटोल तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी प्रेमराज मानमोडे यांच्या गोठ्यासमोर बांधलेला सहा वर्षांचा बैल आणि खापरी बारवकर येथील रोहित राजु उइके या शेतकरी/ गोपालकाची पाच वर्षांची म्हैस (गर्भवती म्हैस) खापरी शिवारातील रोहित वीज पडून जागीच मृत्युमुखी पडली. शेतीत वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या मृत्युमुळे शेतकरी प्रेमराज मानमोडे यांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे शेतीसोबतच दुधाच्या व्यवसायात असलेल्या तरुण शेतकरी रोहित उईके यांचेही मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या खरीप पिकाची तयारी करण्यापूर्वीच, वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी प्रेम राज यांच्यावर दुःखद प्रसंग ओढावला आहे. शेतकरी प्रेमराज मानमोडे व रोहित उइके यांना महसूल, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रेमराज मानमोडे यांच्या बैलाची व रोहित उइके यांचे म्हशी च्या वीज कोसळून मृत्यू ची बातमी मिळताच, कोंढाळी पशु दवाखान्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. इरोस सोमकुंवर यांनी दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून मृत बैल आणि म्हशींचे पंचनामे व शवविच्छेदन केले आणि पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *