BREAKING NEWS:
संपादकीय हेडलाइन

“मंदिर मुक्तीने मौलिक समस्या सुटतील का?”

Summary

सद्या देशात धार्मिक उन्माद वाढवून सामान्यांचे मुडदे पाडल्या जात आहेत अशा वेळेस बुद्धिस्ट टेम्पल मुक्ती लढाई खरंच आवश्यक आहे का? अतिधार्मिक उन्माद माजवून आपणच भारतीय संविधानाला क्षती पोहचवित नाही का?डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जुन्या बौद्ध धर्मातील अनेक संदर्भ बदल करून जगाला […]

सद्या देशात धार्मिक उन्माद वाढवून सामान्यांचे मुडदे पाडल्या जात आहेत अशा वेळेस बुद्धिस्ट टेम्पल मुक्ती लढाई खरंच आवश्यक आहे का? अतिधार्मिक उन्माद माजवून आपणच भारतीय संविधानाला क्षती पोहचवित नाही का?डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जुन्या बौद्ध धर्मातील अनेक संदर्भ बदल करून जगाला वैज्ञानिक “नवयान” अर्थात न्यू स्कुल ऑफ बुद्धिजम दिले ते आपणच समाप्त करून हिनयान,महायान, वज्रयान वाढवन्यात मोठा वाटा आपणच निभावतो का? वा अंधश्रद्धा भारतात पसरवून,न्यू बुद्धिस्ट सुद्धा त्याच मार्गाने जावे तशीच पूजा-पाठ,धार्मिक अंधश्रद्धाच्या परीकल्पना रुजवीत तर नाही ना! जे नेते ध्येय गाठण्यासाठी अर्थात निवडणुकीत जिंकण्यासाठी राजकारण न करता केवळ (१९३७ चा इंडिपेंडंट लेबर पार्टी व १९५७ चा शेड्युल कॉस्ट फेडरेशन वा त्यानंतर १९७७ पर्यंतचा रिपब्लिकन पक्षाचा निवडणूक इतिहास जरूर बघा) मत विभागणी करून इतरांना पराजित करून केवळ आर्थिक माया जमविण्यासाठी वा गेल्या अनेक दशकापासून पोळी शेकून आपले मोठेपणा सिद्ध करण्यासाठी समाजाला दावणीला लावत तर नाही ना ? ह्या आंदोलनात लोकांचा श्रम,पैसा वा वेळ वाया न घालविता सक्षम कायदेतज्ञद्वारा कायदेशीर मार्गाने पुढे जाता येणार नाही का ? जसे सुप्रीम कोर्टाने इतर मंदिर निर्णय दिला तसे.धार्मिक आंदोलनाच्या नावाने पोळी शेकणाऱ्या वा मोठेपणा मिरविणाऱ्या साठीच जगणाऱ्या नेत्यांना आता समाजात मौलिक समस्याच उरल्या नाहीत असे वाटते का? कायदा निरस्त कायद्याच्या निकषावर होतो तेव्हा जनतेला धार्मिकतेने भडकावून त्यांना इधर उधर चलो करून कुठले ध्येय साध्य करतोय ? हे सर्व प्रश्न स्वतःला वा स्वतःच्या मोठेपणा दाखविण्यासाठी लोकांना मूर्ख बनविण्यासाठी जे राजकीय दलालीच करीत आयुष्य जगतात वा त्यांच्याद्वारा धार्मिक उन्माद माजवून मुळ मौलिक समस्यावरून जनतेला भटकविण्याचा हा मुत्सदी कावा तर नव्हे ना? असे अनेक प्रश्न उभे होत आहेत. राजकारनात जनतेला व्यस्त करून त्यांच्या मुळ समस्या जो नेता सोडवितो वा जो नेता लोकांचे श्रम, पैसे व वेळ वाया न घालविता योग्य नियोजन करून पुढे जातो तोच नेता पीढी घडवितो हे मान्य आहे का? कुठल्याही धर्माचा अतिधार्मिक उन्माद पिढ्या बरबाद करेल वा मंदिर मुक्तीने सामान्यांच्या समस्या सुटत नाहीत हे आपणास कळत नसेल तर स्वतःला तर्कशील, वैज्ञानिक वा बुद्धिस्ट समजून काय उपयोग वा अशा संघटना चालवून काय फायदा? बौद्ध धम्म देव आत्मा,मोक्ष नाकारतो तर पाखंडी पूजा पाठ कशाला? केवळ राजकीय नेत्यांचे वा स्वतःच पोट भरण्यासाठी वा स्वतःचा मोठेपणा मिरविण्यासाठी लोकांना अतिधार्मिक करून जसे कुंभमेळा वा मंदिर वा मस्जिद वाद करून जनतेमध्ये अतिधार्मिक अंधश्रद्धा पसरवून जसे इतर राजकीय पक्ष निवडनुक लढवून प्रधानमंत्री पदापर्यंत पोहचले तसेच आपले बुद्धिस्ट टेम्पल मुक्त करून आपण काही साध्य करणार का ? समाजाच्या मौलिक समस्या शैक्षणिक, सामाजिक,शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता वा इनकम स्लॅब जसे अडीच लाखाचे वर वार्षिक उत्पन्न असल्यास एस्सीला वा दीड लाखाचे वर इतर मागासवर्गीय वार्षिक उत्पन्न असल्यास गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती उच्च शिक्षण घेणाऱ्या पालकांच्या मुलांना मिळत नाही.अनुसूचित जाती वा जमाती, इमाव होणारे अत्याचार, वाढलेले खाजगीकरण, बेरोजगारी रोखण्यासाठी आंदोलन का करीत नाहीत .. आपले बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या निर्धन आहेत व दोन वेळेचे अन्न बऱ्याच लोकांकडे वा कार्यकर्त्याकडे नाही.कित्येक चळवळीतील कार्यकर्ते जे नेत्याचे मागे होते व आहेत ते लोकांकडून वर्गणी गोळा करून तर काही भीक मागून जगताना मी पाहिलेत,त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आंदोलन वा उपाययोजना का केल्या जात नाही! आपले कार्यकर्ते लोकांकडून वर्गणी जमा करून जयंती वा इतर कार्यक्रमात गायकाचे प्रोग्राम आयोजित करून समाजाचे प्रबोधन नावाखाली त्यांना उत्सवप्रिय करतात तर आपले राजकीय नेते मात्र हेलिकॉप्टरमध्ये फिरतात व ते आपले लेकर परदेशात शिकण्यासाठी पाठवतात इतरांच काय? ते परदेश शिष्यवृत्ती भाष्य करतात मात्र महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी इतर राज्यात शिक्षण घेत असल्यास ज्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच वा दीड लाखाचे वर आहे त्या सर्व मागासवर्गीय उच्च घेणाऱ्या विध्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती वा फ्रीशिप महाराष्ट्र सरकारने २०१४ पासून बंद केली आहे त्यावर कुणी का बोलत नाही? केवळ शिक्षणच समाजविकासाचे साधन आहे व प्रगत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही व सद्या देशात केंद्र शासनाची ५७ केंद्रीय विद्यापीठे,राज्य सरकारची ४९७ विद्यापीठे तर ४९७ खाजगी विद्यापीठे आहेत व खाजगी विद्यापीठ्यात बहुतांश सोई सवलती बंद आहेत ह्या मौलिक समस्या नव्हेत का? ऍट्रॉसिटी केसेस रद्द करण्यासाठी हायकोर्टात केसेस सुरु आहेत त्यामुळे एस्सी / एसटी प्रिव्हेंटिव्ह ऍक्ट धोक्यात आहे व संविधानाचे आर्टिकल १७ ची पायमल्ली केल्या जाते ही समस्या नव्हे का ? संविधानाचे आर्टिकल २५ खंड २ (ख)मध्ये केलेल्या स्पष्टीकरणा दोन नुसार हिंदू या शब्दोलेखात शीख, जैन वा बौध्द धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे अर्थात बौद्ध हे हिंदूच आहेत तेव्हा बुद्धिस्ट टेम्पल कायदा रद्द करून वा टेम्पल मुक्त करून आपण हिंदू मधून बाहेर पडणार का ? तसेच संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व मौलिक अधिकाराच्या अन्य तरतुदीना अधीन राहून, सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत हे विसरून चालणार नाही तसेच द हिंदू अडापटेंशन अँड मेंटेनन्स ऍक्ट १९५६, द हिंदू म्यॅरिज ऍक्ट १९५५, द हिंदू मायनॉरिटी अँड गारडियनशिप ऍक्ट १९५६ वा द हिंदू सक्सेशन ऍक्ट १९५६ नुसार बौद्ध हे हिंदूच आहेत तेव्हा ह्या कायद्यातील व्याख्या रद्द करण्यासाठी आपण कुठले आंदोलन करणार ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य माणसाच्या मौलिक समस्या सोडविण्यासाठी जगले आपण मात्र अतिधार्मिक आंदोलन करतो ह्यामुळं अज्ञानी समाज पुन्हा गुलामीच्या दिशेने जाईल हे मात्र नक्की…मला माहीत आहे काही अतिधार्मिक उन्माद आणणारे वा अज्ञानी कार्यकर्ते माझा निषेध करतील मला धमक्याही देतील मला त्यांची पर्वा नाही.(तसेही काहीही उच्च शैक्षणिक पात्रता वा पद नसताना नसताना नेत्यांच्या प्रमाने भारावून गेल्यामुळे कुठलाही तर्क न करता सोशियल मीडियावर काहीही अरवाच्छ लिहितातच.) खरंच हे भिक्कू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दिलेल्या ”बुद्ध आणि त्यांचा धम्म” अपेक्षित कार्य वा निकषप्रमाणे कार्य करतात वा जगतात का? मग ह्यांचे स्तोम कशाला? पुढे नेपाळमधील लूंबिनी ताब्यात घेणार का? जगात पूजा पाठ अंधश्रद्धाच बहुतांश बोद्ध धम्मात चालते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरोहितशाही नाकारतात तेव्हा मंदिर मुक्ती कशासाठी ? मी आपल्या बहुतांश नेत्यांचे राजकारण १९९० पासून अगदी जवळून पाहिलेत एवढेच नव्हे बहुतांश नेत्याच्या स्टेजवर भाषणे दिलीत परंतु ते कार्यकर्त्यांचे जीवनमान उंचविन्यासाठी काहीही करीत नाही व केवळ ते त्यांचा केवळ वापर करताना बघितले.बहुतांश भिक्कू तर हे केवळ पोट भरण्यासाठी होताना पाहिलेत एवढेच नव्हे तर तेरा वर्षे कोर्ट केस भिक्कू विरोधात मी लढलो व स्वतःचा उमेदीचा वेळ अतिधार्मिक श्रद्धेत किती फायदा होतो व पोटभरू भिक्कू किती समाजपयोगी जगतात ह्याची जाणीव व प्रत्यक्ष अनुभव मी माझे बरोबर असणाऱ्या हजारो चळवळीत सेवा देणाऱ्यानी अनुभला. नागपूरला तर भिक्कूने भिक्कूनीची हत्या केली तर अनेक भिक्कूना बायका पोर आहेत तर केवळ पूजा पाठ करायला उपासकांना लावतात तर मनोरंजन व संपती जमा करण्यासाठी बहुतांश भीक्कू उपसंपदा घेतात तर बहुतांश राजकीय नेते राजकीय पोळी शेकताना मी पाहिलेत.आपण सर्व जनतेला ज्या राजकीय नेत्यांनी वा भिक्कूनी जे मंदिर मुक्तीचे आंदोलन सुरु केले त्यात सामील होण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत त्यांना युवकांच्या वा समाजाच्या मौलिक समस्या सोडविण्यासाठी आंदोलन करायलाही सांगा ही नम्रवजा सूचना.. बाकी आपली मर्जी, ज्यांचं मोठेपणा मिरविण्याचे वा पोट भरण्याचे मार्ग हे वेग वेगळे आहेत वा ज्यांना मोठेपणा मिळविण्यासाठी झुंड मध्ये सामिल होऊन जगण्याची सवय झालीय अशी लोक कशी जगतात हे मलाही कळत … फक्त डॉ.आंबेडकरांचे दिलेले आधुनिक वैज्ञानिक बौद्ध धम्माचे नवयान हे आपल्या राजकीय वा मोठेपणा मिळविण्याच्या हेतूसाठी महायाण, हीनयान वा वज्रयान करू नका ही अपेक्षा..
ॲड.डॉ.सत्यपाल कातकर,
मनोवैज्ञानिक,
शैक्षणिक समुपदेशक,माजी प्राचार्य, माजी विशेष प्रतिनिधी भिमपत्रिका,पंजाब तथा लेखक,
मो.९८२२७२२७६५
ह्यातून मला कुठलाही लाभ वा मोठेपणा मिरवायचा नाही, कुणाच्या धार्मिक भावेनेला ठेचं पोहचवण्याचा हेतू नाही,माझा दर्जा माझ्या सर्वोच्च शिक्षणामुळेच आहे त्यामुळेच सामान्य जनतेला योग्य देशेनी नेण्यासाठी हे लिखाण केले,योग्य वाटल्यास चिंतन करा वा इतरांना फॉरवर्ड कराल ही नम्र अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *