BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

भारतीय संविधान हा सर्व भारतीयांच्या सन्मान व अधिकारांचा मसुदा — ॲड. डॉ. सत्यपाल कातकर यांचे मत

Summary

चंद्रपूर (राजुरा) दि. लक्कडकोट (पेसा) फाउंडेशन आणि लक्कडकोट कर्मचारी संघ मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस, संयुक्त जयंती, समाजप्रबोधन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लक्कडकोट येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध […]

चंद्रपूर (राजुरा)
दि. लक्कडकोट (पेसा) फाउंडेशन आणि लक्कडकोट कर्मचारी संघ मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस, संयुक्त जयंती, समाजप्रबोधन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लक्कडकोट येथे पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, संविधानतज्ञ, अधिवक्ता तथा उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक ॲड. डॉ. सत्यपाल कातकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी संविधानाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की,
“भारतीय संविधान हे कथा, कादंबरी किंवा साहित्यिक पुस्तक नसून सर्व भारतीयांना सन्मानाने जगण्याचा, न्याय मिळवण्याचा आणि समानतेचा हक्क देणारा मूलभूत मसुदा आहे.”

भारताच्या वीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

छत्रपती शिवाजी महाराज,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

मौलाना अबुल कलाम आझाद,

पंडित जवाहरलाल नेहरू,

भगवान बिरसा मुंडा,

महात्मा ज्योतिबा फुले
आणि

शामदादा कोलाम
यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

यशस्वी विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा सत्कार

या कार्यक्रमात लक्कडकोट परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सत्कारित विद्यार्थी व अधिकारी :

लक्ष्मीकांत दुर्गे — पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड

अजय मडावी — PSI निवड

रोहिणी उपरे — 7 वी मध्ये प्रथम

सुहाना काशिम शेख — 10 वी गुणवत्ता

लक्ष्मीप्रसन्न पांडुगवार — 12 वी गुणवत्ता

त्यांच्या यशाचा ग्रामीण तरुणांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश समोर ठेवण्यात आला.

संविधानावरील चिंतन — कातकर यांचे थेट विधान

श्री. कातकर म्हणाले,
“स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे नाव घेत देशाला दिशाहीन करण्यात काही राजकीय शक्ती पुढे सरसावल्या. पैशाच्या जोरावर लोकशाही मक्तेदारी निर्माण झाली. सामान्य नागरिकाला अतिधार्मिक बनवून त्याची तर्कशक्ती कमकुवत केली जात आहे.”

ते पुढे म्हणाले,
“आपण आपल्या समाजात संविधानतज्ञ निर्माण केले नाहीत. त्यामुळे संविधानातील काही अनुच्छेदातील बदल रोखणे आपल्याला शक्य झाले नाही. ही गंभीर बाब आहे.”

सर्व समाजांना एकोपा वाढविण्याचा संदेश

कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. डॉ. मधुकर कोटनाके, माजी मुख्याध्यापक, यांनी भाषणात सांगितले:
“लक्कडकोट गावात सर्व समाजांना एकत्र आणण्याचे काम रमेश आडे सरांनी केले; त्यांचा उपक्रम इतर गावांनी स्वीकारल्यास बंधुभाव निश्चितच वाढेल.”

प्रमुख उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला विचारमंचावर स्थान घेतलेले मान्यवर :
देविदास कातकर (पोलीस पाटील),
सजनाबाई आत्राम (सरपंच),
भानुताई मुन,
दिनकर आडे (पोलीस पाटील),
विजय कांबळे,
नूर पटेल,
तुकाराम किन्नाके,
रामचंद्र कातकर,
मनोज मुन,
आणि इतर सामाजिक कार्यकर्ते.

कार्यक्रम यशस्वी करणाऱ्यांचे श्रम

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रभाकर मडावी यांनी केले.
आभार श्रीमती सीमा कोरवते यांनी मानले.

या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी रमेश आडे, माध्यमिक शिक्षक आणि लक्कडकोट गावातील सुज्ञ नागरिकांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *