नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

खरीप हंगामपूर्व नियोजन सभा…! शेतकरी जगला तरच आपण ही जगू तालुक्यात नकली बीयाणे व खात आढळ्यास कठोर कारवाई आमदार चरणसिंग ठाकूर

Summary

काटोल- काटोल नरखेड तालुक्यात नकली बीयाणे, खात, नकली कृषी औषधी विक्रीच होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार. शेतकरी जगला तरच आपण ही जगू,म्हणून तालुका कृषी अधिकार्यांसह प्रत्येक कृषी सहायकांनी आप आपल्या भागातील कृषी केंद्र तसेच अन्य ठिकाणाहून बोगस बीयाणे […]

काटोल-
काटोल नरखेड तालुक्यात नकली बीयाणे, खात, नकली कृषी औषधी विक्रीच होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार. शेतकरी जगला तरच आपण ही जगू,म्हणून तालुका कृषी अधिकार्यांसह प्रत्येक कृषी सहायकांनी आप आपल्या भागातील कृषी केंद्र तसेच अन्य ठिकाणाहून बोगस बीयाणे येणार नाही याची दक्षता घ्यावी. आपणाकडून होत नसल्यास मी बोगस बीयाणे व खात पकडले तर कृषी विभागाच्या संबधीतीत अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई चे पावले उचलली जातील .
शेतकरी जगला पाहिजे करीता शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विकसित साधनांची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचे बांधावर जा, गाव बैठका घ्या, शेतकऱ्यांचे शेतीपोत तपासणी साठी माती परीक्षण करून अहवालानुसार योग्य ती काळजी घेऊनच शेतकरी जगला पाहिजे अश्या उपाय योजना करण्यात यावी. अशी माहिती काटोल चे आमदार चरण सिंह ठाकूर यांनी काटोल तालुक्यातील येथे पंचायत समिती चे सभागृहात आयोजित खरीप हंगाम पुर्व नियोजन बैठक देऊन कृषी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.
14मे रोजी काटोल येथील पंचायत समितीच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व नियोजन सभा पार पडली. या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, महसूल विभागाचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधींचाही या बैठकीत सक्रिय सहभाग होता.

या नियोजन सभेचे उद्दिष्ट येणाऱ्या खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करणे, शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हे होते. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बी-बियाणे, युरिया व अन्य रासायनिक खते मिळावीत यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी औषधांचा साठा पुरेसा ठेवावा, तसेच त्याचे वितरण सुरळीत व्हावे यावरही भर देण्यात आला.

शेतीमालाच्या बाजारभावाबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळवून देण्यासाठी ‘ई-नाम’ आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा अधिक प्रभावी वापर व्हावा, अशी सूचना करण्यात आली. शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत नवकल्पना आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध कार्यशाळा व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याबाबत चर्चा झाली.

शेतकरी सशक्तीकरणासाठी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृती मोहिमा राबविण्याचे ठरविण्यात आले. सिंचनाच्या उपलब्धतेबाबतही आढावा घेण्यात आला व आवश्यक ठिकाणी जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्याचे ठरले.

या बैठकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. खरीप हंगामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती व संचालक दिनेश ठाकरे,उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, जिल्हा कृषी अधीक्षक मनोहरे, तहसीलदार राजू रणवीर, तालुका कृषी अधिकारी रचना भोसले, काटोल चे ठाणेदार मेश्राम, कोंढाळी चे ठाणेदार त्रिपाठी, तसेच कृषी, वन, वीज, बांधकाम , पेयजल, तसेच संबधीतीत अधिकारी तथा कर्मचार्याचे उपस्थित खरीप हंगामपूर्व नियोजन सभा संपन्न झाली असून, यामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *