कोरोनातही….प्रितीच सत्य.. अखेर जीव शाबुत आहे……. प्रिती दरेकर यांनी व्यक्त केली अनुभवाची प्रतिक्रिया.

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 मे 2021:-
आला होता असा प्रसंग माझ्यावर जो ह्या कोरोनाच्या काळात तसाच अनेकांवरही ओढावला, मलाही आॕक्सिजन बेडसाठी अनेकांना फोन करावे लागले, लाखो रुपयांची ट्रिटमेंट घेवुन टचाटच टोचल्या जाणाऱ्या इंजेक्शन्सला न घाबरता सामोरे जावं लागलं. कधी पोटाला इन्सुलीन टोचलं, कधी दंडाला कोणतं इंजेक्शन टोचलं तर काही इंजक्शन सलाईन मधुन सोडण्यात आले.
अचानक एक दिवस कोरडा खोकला ऊद्भवला,काही दिवस छोट्या दवाखान्यांच्या पायऱ्या झीजवत बसलो खरं, पण मग अचानकच वास येणं बंद झालं,जीभेची चव गेली आणि नंतर दहा बारा दिवस माझ्या शरिराने अन्नाचा जणू प्रतिकारच केला, ?? दोन घास खाल्लेकी उलट्याच व्हायच्या ना अन्न पोटात गेले ना औषधी …..
मग आता काय? शहरातील मोठ्या दवाखान्याचे उंबरठे झीजवायचे बाकिच होते! मोठ्या सर्व दवाखान्याच्या डाॕक्टरांनी CT स्कॕन करायला सांगीतले..ती प्रोसेस झाल्याशिवाय मला कुठेच अॕडमीट करुन घेतल्या जाणार नव्हतच… मग बारा दिवसाचं उपाशी पेशंट म्हणजे शेवटी प्रिती सीटी स्कॕन करण्यासाठी टुविलर ने सकाळी सहाला चंद्रपुर च्या वाटेने निघाले कारण त्या वेळेला वणीत कुठेच सीटीस्कॕन सेंटर नवतं परंतु ते आता आहे….
सिटीस्कॕनचा रिपोर्ट बघुन मला कसंबसं अॕडमिट करुन घेतलं सहा दिवस दवाखान्यात ट्रिटमेंट झाली परंतु दवाखान्याचं लाखातलं बिल भरणार कसं? तर घरात जे काही सोन्याची वस्तु मिळाली ती गहाण टाकुन ही बिलं फेडायची ठरवलं आणि गोप आंगठी सोबतच मी अॕडमिट होण्यापुर्वी गळ्यातलं मंगळसुत्र(जे माझं रोजच्या वापरातलं होतं ते घरच्यांना माहिती नवतं) काढुन ठेवलं होतं ते सगळं घरच्यांनी गहाण टाकुन माझा जीव वाचवला .
जी अडचण आली ती आली अखेर जीव शाबुत आहे ह्यातच समाधान.
कडक लाॕकडाऊन असल्यामुळे कामधंदे बंदच पैसा आधिच नाही त्यात हा कोरोना….. आमच्या वणीचे युवा नेते विक्रांतजी चचडा ह्यांना जागतिक महिला दिनी प्रमुख पाहुणे म्हणुन मी कार्यक्रमाला बोलवलं होतं त्यांच्याच शाळेत माझा मुलगा शिक्षण घेतो., जेव्हा विक्रांत सरांना कळलं की मी आजारी आहे मला अन्न चालत नाही….?? तेव्हा सरांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सांगुन चारपाच वेळा घरी फळं पाठवलीत. खूपखूप धन्यवाद !!समाजाची काळजी घेणाऱ्या उभरत्या नेतृत्वाची समाजाला खूप गरज आहे.
माझे पती ,माझा दिर-जाऊ,माझा भाऊ आणि भावजेने तर खूपच परिश्रम घेतले. माझ्यासाठी केलेले उपकार कधिच विसरणार नाही .कारण मला कोरोना झाला आहे हे माहित असुनही चार महिन्याच्या गरोदर भावजेने मला सलाईन लावली. एवढच नाहीतर महिनाभर जेवणाचा डब्बा पाठवला, माझ्या दिरांची मुलगी जेमतेम तेरा महिन्याची असुनही ते प्रत्येक दवाखान्यात माझ्यासोबत बेड मिळवुन देण्यासाठी आले, माझा भाऊ ज्याला अस्थमाचा त्रास असुन सतत माझ्या सहवासात हवं नको तेव्हा…बघायला यायचा, माझ्या पतीबद्दल तर शब्दच नाहीत कायम माझ्या बेड बाजुला खाली अंथरुण टाकुन झोपलेले असायचे मी मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा रात्र रात्र जागुन माझी सेवा केली माझी त्यांनी, माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व नातेवाईक सतत फोनवरुन माझ्या तब्बेतीची विचारपुस करत होते, आणि मला ह्या सर्वांमुळे खूप धीर मीळत होता.
आणि काही असेही नमुने असतात जे साधं बघायला आले नाही मी मेली की जिवंत आहे तर, काहिंना मदत मागितली असता पाठ फिरवणारे ही होते, तर काहींनी साधा फोन करुन तब्बेतीची विचारणाही केली नाही… पण आज खरच असं वाटतं की संकट येणं गरजेचच असतं ,किमान आपलं कोण ?परकं कोण ? हे तरी कळतं…
आपल्या माणसांची साथ कधिच सोडु नका, कोरोनाच काय कोरोनाचा बाप आला तरी तुम्हाला कुणीच हरवु शकत नाही.
महिना झाला आता सगळा विकनेस गेला ,थकवा गेला, आणि प्रकृती ठणठणित आहे…
सोना गया तो गया
सर सलामत तो पगडी पचास
असं म्हणतात ना ते खरच आहे.
आपल्या माणसांची साथ खूप महत्वाची असते. बारा दिवस अन्नपाणी न घेताही मी मरणावर विजय मिळवला तो मी एकटीने अजिबात नाही, सर्वांचं प्रेम आणि आशिर्वाद कायमच माझ्या सोबत होते.
आणि मी जिवंत आहे तर काहितरी सत्कार्य माझ्या हातुन घडायचं राहुन गेलय त्यासाठीच.
आईवडीलांना लेक परत मिळाली. भावाला बहिण परत मिळाली, माझ्या पतिंची बायको परत मिळाली आणि शेवटी माझ्या बच्चुला त्याची आई परत मिळाली…..
आता प्रत्येक विभागाच्या डॉक्टरांनी कोरोना च्या निमित्ताने भक्कम कमाई केली ….हार्टवाले… फुफ्फुसवाले… सगळ्यांनी हात धुवुन घेतले ..! पण यांचे भाऊबंद
नाक, कान, दांत व डोळ्यांचे डॉक्टर मागे राहीले .
मग यांच्या साठी आणला …
म्युकरमायकोसिस..??
पण नंतर बालरोगतज्ज्ञ असलेली ही जमात मागासली? म्हणून…मग तिसरी लाट लहान पोरांवर लोटली ? .सगळ्यांचे भागले पण तरी अजून एक छोटी जमात दुर्लक्षित राहिली आहे .आता फक्त मुळव्याध, भगंदर यांचे डॉक्टर बाकी आहेत.
त्यांचे पण अच्छे दिन येणार आहेत…ज्यांनी भरपूर गरम पाणी, काढ़ा, व इतर उष्ण पदार्थ खाल्ले आहे,त्यांनी आता सावधान रहावे….!त्याच्यावरचा एखादा अवघड जागेचा आजार थोड्याच दिवसात लाँच होणार आहे .?? म्हणून काळजी घ्या, सुरक्षित रहा.