वर्धा

▪० शिक्षक दिन ० ▪ ▪ खरा शिक्षक दिन▪ ▪ शिक्षक दिनाचे खरे मानकरी कोण ??▪ ▪ आमचा बहुजन समाज केव्हा समजेल ??▪ ▪शिक्षक दिनाच्या निमित्ताने सहज सुचलं म्हणून▪

Summary

▪महेश देवशोध ( राठोड ) ▪ ० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ० ‘ जगातील कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे ‘ असे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. यांनाच राजर्षी शाहू महाराज भारताचे मार्टिन […]

▪महेश देवशोध ( राठोड ) ▪

० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ०

‘ जगातील कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे ‘ असे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. यांनाच राजर्षी शाहू महाराज भारताचे मार्टिन ल्युथर म्हणून संबोधतात. तर महाराणा सयाजीराव गायकवाड हे भारताचे वाशिंग्टन म्हणतात ते शिवजयंती चे प्रणेते तसेच पुणे येथील पहिली मुलींची शाळा सुरू करून बहुजन समाजातील घरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे काम करणारे पहिले शिक्षक महात्मा फुले. त्यामुळेच आज मराठा सेवा संघ व इतर काही सामाजिक संघटना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने खरा शिक्षक दिन साजरा करताना दिसतात पण ते आजही आमच्या बहुजन समाजाला समजले नाही हीच खूप मोठी शोकांतिका आहे .
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. शाळेत शिकत असतांना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘ सेंद्रिय बुद्धिवंत ‘ असे संबोधले आहे तर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली झाला. तर महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इसवी सन 1852 मध्ये शाळा स्थापन केली. तर मग शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा कसा होतो?? हा प्रश्न आमच्या तरुणांना पडत का ?नाही. राधाकृष्णन यांनी उभ्या आयुष्यात एकही शाळा सुरु केली नाही. पण त्यांच्या जन्मापूर्वी केवळ चार वर्षात महात्मा फुलेंनी 20 शाळा सुरू करून विद्यादानाचे मोफत कार्य केले. राधाकृष्णन यांनी विद्यावेतन घेऊनही एकाही बहुजनांच्या मुलांना शिकवल्याचा पुरावा नाही तर मग शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा करायचा का ? हा प्रश्न बहुजन समाजातील तरुणांना पडला पाहिजे.
ज्योतिरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीमाई . त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होते. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार विज्ञानवादी, प्रयत्नवादी, अनिष्ट प्रथा, चालीरीती, स्वर्ग नरक या काल्पनिक संकल्पना त्यांना मान्य नव्हत्या तर राधाकृष्णन हे दैववादी, परंपरावादी, स्वर्ग-नरक यावर विश्वास ठेवणारे लग्नही स्वर्गात जुळतात अशी मांडणी करणारे खरे शिक्षक असू शकतात का ? तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी बाल विवाह रोखण्यासाठी विरोध केला तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह बालवयात केला म्हणजेच राधाकृष्णन यांना बालविवाह मान्य होता हे स्पष्ट दिसून येते.
महात्मा फुलेंनी ‘ चूल आणि मूल ‘ या धर्म व्यवस्थेवर आघात करून स्वतःच्या पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन स्त्रियांसाठी देशात 1 जानेवारी 1848 रोजी सर्वप्रथम सुरुवात केली तसेच ‘ स्त्रीयांचा जन्म मानवी उत्कर्षासाठी ‘ असे म्हणत तसेच त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, विधवा-पुनर्विवाह, अस्पृश्यता, स्त्री-शिक्षण या ज्वलंत प्रश्नासाठी आयुष्यभर लढा दिला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या पत्नीला अशिक्षित ठेवून फक्त चूल आणि मूल ही ब्राह्मणी व्यवस्था सिद्ध करून दाखवली तसेच ‘ स्त्रीयांचा जन्म सेवेसाठी आहे ‘ असे त्यांचे मत होते.त्यांनी एकही लढा दिला नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र सूर्यप्रकाशा सारखे स्वच्छ व तेजस्वी आणि आदर्श होती तसेच त्यांनी तथागत गौतम बुद्ध , महासम्राट बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान समजून प्रबोधनाची सुरुवात केली तर राधाकृष्णन यांचे आदर्श म्हणजे विनायक दामोदर सावरकर होते ‘ संदर्भ खरा शिक्षक दिन ‘ लेखक श्रीमंत कोकाटे मग हेच सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालच्या स्तरावर लिखाण करतात तेव्हा राधाकृष्णन यांचे चरित्र कसे असेल हे वेगळे सांगण्याची गरज काय ?
महात्मा ज्योतिबा फुले यांना बहुजन समाजातील गरिबांची तळमळ होती म्हणून तर त्यांनी ‘ गुलामगिरी ‘ शेतकऱ्याचा आसूड ‘ ‘ ब्राह्मणांचे कसब ‘ ‘ ‘ ” ‘ सार्वजनिक सत्य धर्म ‘ तसेच देशातील पहिले नाटक ‘ तृतीय रत्न ‘ लिहिली फुलेंच्या साहित्यामुळे पुरोगामी विचारांची बीजे पेरली गेली त्यामुळे याच प्रेरणेतून अनेक संघटना निर्माण झाल्या तर राधाकृष्णन हे वैदिक, सनातनी साहित्याची लेखक होते. ‘संदर्भ दैनिक देशोन्नती ‘ इतिहास संशोधक, श्रीमंत कोकाटे 5 सप्टेंबर 2019 यांनी फक्त ब्राह्मणाच्या उदात्तीकरणासाठी ब्रह्मसूत्र, वेदातील नीतिशास्त्र, धर्म आणि समाज आणि शृंगारिक साहित्यात ‘ लीलांचा गुन्हा ‘ ही कादंबरी टोपणनावाने लिहिली तेव्हा प्रतिगामी विचारांची बीजे पेरली गेली त्यामुळे बहुजनांसाठी देशात एकही संघटना निर्माण झाली नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा म्हणून इंग्रजांना निवेदन दिले परंतु राधाकृष्णन यांच्या काही पिलावळीमधील कुंटे यांनी हंटर कमिशन आयोगास बहुजनांना शिक्षणाची गरज नाही ‘ संदर्भ खरा शिक्षक दिन ‘ लेखक श्रीमंत कोकाटे .
राधाकृष्णन यांनी राजदूत, राष्ट्रपती, कुलगुरू अशी पदे उपभोगली त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थापक, शिवजयंती चे जनक , शेतकरी, कामगार, नाभिक यांच्या संघटना स्थापन करून सार्वजनिक कार्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुरस्कार नव्हे तर ब्राह्मणांचा तिरस्कार प्राप्त झाला . परंतु ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथील सभेत रावबहाद्दूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले आज कोणालाही भेटणाऱ्या भारतरत्न पुरस्कारा यापेक्षा कितीतरी पटीने महात्मा ही पदवी श्रेष्ठ आहे.
महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्तम साहित्यिक, प्रतिभावंत संशोधक होते तर राधाकृष्णन हे कसे आणि काय करत होते हे विश्वविख्यात तत्त्ववेत्ते आचार्य रजनीश यांनी त्यांच्या ‘ संदर्भ – ज्यु मछली बिन निर पृष्ठ क्रमांक 170 ते 171 या पुस्तकात लिहिले आहे. तसेच राधाकृष्णन हे स्त्रीशिक्षणाच्या विरुद्ध होते . असे त्यांचे चिरंजीव डॉक्टर सर्वपल्ली गोपाल सांगतात ( रेफरन्स राधाकृष्ण अ बायोग्राफी- एस गोपाल ) ( ref. Radhakrishna A biography-S. Gopal ) आज जगभर मुक्त विद्यापीठे सुरू झाली आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विद्यापीठातून लाखोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचे एक गोड फळ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण मुक्त शिक्षणाची संकल्पना ही महात्मा ज्योतिबा फुले यांचीच आहे.
‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘ दीनबंधू ‘ हे साप्ताहिक चालविले जात असे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगाचा महात्मा फुले यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले आहेत. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते . त्यांनी आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केलेला आहे. तसेच अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1990 रोजी झाला. तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. 1891 मध्ये प्रकाशित झाला.
आज आमच्या बहुजन समाजातील लोकांनी, शिक्षकांनी, शाळेतील तरुण-तरुणींनी गावागावात 5 सप्टेंबर ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन 28 नोव्हेंबर हा खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा लागेल . तेव्हा खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यू दिनानिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल हे मात्र निश्चित.
▪ शेवटी निर्णय तर बहुजनांना घ्यायचा आहे▪

▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध (राठोड ) ▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *