खंडाळा पांधन रस्त्याचे दोनदा भुमिपुजन होऊनही कामाच्या प्रतिक्षेत

कन्हान : – खंडाळ्यातील पांदण रस्ता कामाच्या प्रति क्षेत असुन या रस्त्याचे भुमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांनी दोनदा केले आहे पण पावसाळाजवळ येऊनही पांदण रस्त्याच्या कामाला हात न लागल्या मुळे शेतकर्यात प्रचंड असंतोष आहे.
खंडाळा (घटाटे) ते गहू हिवरा या रस्त्यावरून श्री विनायक हटवार यांच्या शेताच्या बाजुने पश्चिमेकडे एक पांदण रस्ता गेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पांदण रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे पावसा ळ्यात या पांदन रस्त्यावरून वहिवाट करण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक दा पाय घसरून पडणे, बैलबंडी फसणे इत्यादी प्रकार दरवर्षी होत असतात. हा प्रकार आमदार आशिष जयस्वाल यांच्या निदर्शनात ग्रामस्थांनी आणला अस ता सदर पांदन रस्ता बनवुन देण्याचे आश्वासन दिले. व गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तसेच ३ एप्रिल २०२१ ला आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाढदिव सानिमित्त असे दोनदा उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांनी केले. चार दिवसात कामाला सुरुवात होईल असे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले होते. पण महिना लोटुनही कामाला सुरुवात झाली नाही. पावसा ळा जवळ आला आहे अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लाग णार काय ? वहिवाटी ला रस्ता नसल्यामुळे जमीन पडीत ठेवावी लागणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535