वाढत्या महागाईविरूद्ध येत्या ११, सप्टेंबर ला चंद्रपुरात आंदोलन

चंद्रपूर, ०९ सप्टेंबर – २०१४ साली सत्तेत येण्यापूर्वी केंद्रातील प्रस्थापित सरकारने ‘आम्ही सत्तेत येताच सिलिंडर २०० ते ३०० रुपये करू’ असा शब्द सामान्य जनतेला दिला होता. हा शब्द फक्त तोंडा पुरताच होता का ? असा प्रश्न आता देशातील वाढत्या, वस्तूंच्या दरवाढीत तसेच सिलिंडर च्या वाढत्या दरवाढी बाबतीत सामान्य जनतेला पडला आहे. २०१४ साल च्या पूर्वी आगामी सरकारच्या काळात गॅस सिलिंडर ४१० रुपयाला होते तेव्हा प्रस्थापित सरकारने चुलीवर पोळ्या शेकत रस्त्यावर आंदोलने केली होती. आता त्याच सरकारच्या काळात गॅस सिलिंडर ची किंमत ९०८ रुपये म्हणजेच दुप्पट झालेली असून त्यात, या १ सप्टेंबर पासून २५ रुपयाची भर पडून ते ९३३ रुपयाला झाले आहे. याला जिम्मेदार कोण प्रस्थापित सरकार की यांना निवडून सत्ता देणारी सामान्य जनता असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
म्हणून, या देशातील वाढत्या महागाई विरूद्ध जन सामान्य माणसांशी संवाद साधले असता व विविध वार्डात होत असलेल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता त्यांचा या महागाई विरुद्ध आक्रोश दिसून आला. आणि म्हणून येत्या ११ सप्टेंबर २०२१ ला दुपारी १२:३० वाजता अखिल भातीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने *डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चंद्रपूर* येथे चुल पेटवा आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘वाढत्या महागाई विरूद्ध एकत्र येउन आवाज उठवूया’ अशी घोषणा देत जनसामान्य माणसांनी जास्तीत जास्त या आंदोलनात शामील व्हावे अशी विनंति पक्षाचे राजेश खोबरागडे, जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, महिला जिल्हा अध्यक्ष मृणल कांबळे, महिला सचिव लिणा खोबरागडे, सहसचिव प्रेरणा करमरकर, शहर सचिव अश्विनी खोबरागडे, अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर इ. पदाधिकाऱ्यांनी केले आहे.