BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जागतिक पर्यावरण दिन सिल्लोड नगर परिषद करणार 2 लक्ष वृक्षारोपण नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्याहस्ते उपक्रमाचा शुभारंभ

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5, सिल्लोड शहर स्वच्छ व हरित शहर करण्यासाठी तसेच शहरात पर्यावरण संतुलन आणि नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळावी यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली शहरात 2 लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प सिल्लोड […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5, सिल्लोड शहर स्वच्छ व हरित शहर करण्यासाठी तसेच शहरात पर्यावरण संतुलन आणि नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळावी यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली शहरात 2 लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प सिल्लोड नगर परिषदेने केला असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी सय्यद रफिक, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, प्रशासकीय अधिकारी सुनील गोराडे, अजगर पठाण, अनवर खा पठाण, अभियंता राहुल राजपूत, शेख अजीम शेख गणी, विलास तावडे, प्रकल्प समनव्यक श्रीमती अल्का सूर्यवंशी, प्रभाकर शिंदे, सुधाकर पाथ्रीकर, खुशाल गोराडे, श्रीराम काथार, गोरख धाडगे आदींची उपस्थिती होती.

भविष्यातील गरज लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने “झाडे लावा , झाडे जगवा ” हा उपक्रम नगर परिषदेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नगर परिषदेच्या वतीने शहरातील अव्हाना रोड, पाबळवाडी रोड, ईदगाह रोड असे विविध रस्ते तसेच शहरातील ओपन स्पेस इत्यादी ठिकाणी 2 लाख वृक्ष लागवडीचा नगर परिषदेने संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत नगर परिषदेने मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले असून शहरातील शैक्षणिक संस्था, धार्मिक व प्रार्थना स्थळे , सरकारी , निमसरकारी कार्यालये व शहरातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहेत.

———————————————–
*वृक्ष संगोपन व संरक्षण काळाची गरज*

आजची परिस्थिती पाहता मानवी जीवनासाठी ऑक्सिजन किती महत्वाचे आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्यासाठी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे आणि आहे त्या झाडांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *